वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

निपुण महाराष्ट्र अभियान सुरू – Nipun Maharashtra Mission Begins!

Nipun Maharashtra Mission Begins! : विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्य शासनाने निपुण महाराष्ट्र अभियान अधिक काटेकोरपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नागपूर जिल्ह्यात मार्च ते जून या चार महिन्यांत हा उपक्रम प्रभावीपणे लागू केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यासंबंधी आदेश जारी केले असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ज्ञान आणि कौशल्ये अधिक मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार, प्राथमिक स्तरावर २०२६-२७ पर्यंत विद्यार्थ्यांमध्ये भाषिक आणि गणिती कौशल्य विकसित करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी राज्य सरकारने शाळांमध्ये त्वरित अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ मार्च ते ३० जून या कालावधीत विशेष उपक्रम राबविला जाईल. अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेतील दुसरी ते पाचवीच्या वर्गातील किमान ७५ टक्के विद्यार्थ्यांनी ठराविक अभ्यासक्रम आत्मसात करावा, असा उद्देश ठेवण्यात आला आहे.

nipun maharashtra abhiyan

विविध प्रकारच्या शाळांमध्ये अंमलबजावणी
निपुण महाराष्ट्र अभियान फक्त शासकीय आणि अनुदानित शाळांपुरते मर्यादित नसून, स्वयंअर्थसहायित आणि विनाअनुदानित शाळांमध्येही हे अभियान राबवले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी हे अभियान एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

अभियानाची रचना आणि अंमलबजावणी
अभियानाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाने विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. यात –

विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीदरम्यान अतिरिक्त सराव घेण्याचे नियोजन
अभियानाची रचना आणि अंमलबजावणी
अभियानाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाने विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. यात –

विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीदरम्यान अतिरिक्त सराव घेण्याचे नियोजन
शिक्षक आणि शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी विशेष कार्यक्रम
लोकसहभाग वाढवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन
केंद्र स्तरावर शिक्षण परिषदांचे नियोजन
शाळा भेटीद्वारे प्रत्यक्ष निरीक्षण

शिक्षकांना विशेष जबाबदारी
हे अभियान यशस्वी करण्यासाठी शिक्षकांना उन्हाळी सुटीतही काम करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास व्हावा, यासाठी शाळांनी आणि शिक्षकांनी शालेय वेळेतच आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच सुट्टीचा उपयोग करून विद्यार्थ्यांना अधिक मदत करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शन द्यावे, असे शासनाने निर्देश दिले आहेत.

अभियानातील प्रोत्साहन व सन्मान
या अभियानाअंतर्गत दिलेल्या कालावधीत अपेक्षित अध्ययन स्तर गाठणाऱ्या शाळा, शिक्षक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा शासनातर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे. त्यामुळे शाळांना आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी अधिक प्रोत्साहन मिळणार आहे.

शिक्षण विभागाचा पुढील मार्गदर्शन
नागपूर जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षण विभागाने सर्व संबंधित घटकांना स्पष्ट आदेश दिले आहेत. शिक्षण विभागाचे अधिकारी, शाळा मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक यांची जबाबदारी महत्त्वाची राहणार आहे. योग्य नियोजन आणि सहकार्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

BOB PMO Professional – पदवीधर ; ५ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

BOB PMO Recruitment 2026 - Bank Of Baroda invites Online applications in prescribed format till last date 31/7/2026 for.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *