वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 5 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत रद्द !

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 5 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत रद्द !

Big Decision by the Central Government :केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय: 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत रद्द !

केंद्र सरकारने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे धोरण लागू केले होते, परंतु आता या धोरणात बदल करण्यात आले आहेत. सरकारने सरसकट पास करण्याचे धोरण रद्द केले आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा निर्णय केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सैनिकी शाळांसारख्या 3000 पेक्षा अधिक शाळांना लागू होईल.

Central Government big decision

जर एखादा विद्यार्थी नापास झाला, तर त्याला पुनर्परीक्षेसाठी संधी दिली जाईल. परंतु जर तो पुन्हा नापास झाला, तर त्याला त्याच इयत्तेत राहून पुन्हा शिकावे लागेल. तथापि, विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत शाळेतून काढले जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने “नो डिटेन्शन पॉलिसी” संपवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे आगामी शालेय वर्षात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा नापास झाल्यावर त्यांना पुढील इयत्तेत ढकलले जाणार नाही. यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारेल, असे मानले जात आहे.

या बदललेल्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता सुधारेल आणि त्यांच्या अकॅडमिक प्रदर्शनातही सुधारणा होईल, असे शिक्षण मंडळांनी म्हटले आहे. ही पॉलिसी काही काळापासून चर्चेचा विषय होती, आणि आता या नियमाची अंमलबजावणी केली जाईल.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

SBI Bank Bharti 2026

खुशखबर !! SBI बँकेत १ हजार ५३८ लिपिक पदांची भरती ,नवीन जाहिरात प्रकाशित; लगेच अर्ज करा ! SBI Bank Bharti 2026 1538 Posts

Here is some good news for candidates aspiring to work in the banking sector. An …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *